Abhangas are nothing but short verses spontaneously uttered by Sant Shri Tukaram Maharaj on various occassions especially to express his deep love towards Lord Vithhal. However, there exists those abhangas also which got uttered spontaneously to epxress emotions such as concerns, rage, condemptionsm empathy, mercy etc. towards the surrounding world when situation present itself.
तुकोबांच्या अभंगांची वैशिष्ट्ये म्हणजे ते नेहमी त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे निघत असून त्यात्या प्रसंगाच्या अनुषंगाने आणि साजेसेच अभंग त्यांच्याकडून सहज रचले गेले किंबहुना देवानेच ते त्यांच्या मुखातून वदवले. अशा ह्या त्यांच्या अद्वितीय अभंगांत काही अभंग मार्गदर्शनपर आणि उपदेशात्मक आहेत, तर काही त्यांना रोजच्या जीवनात येत असलेल्या अनुभवांचे बोल आहेत. काही देवाशी वाद-विवाद, चर्चा, संवाद साधणारे आहेत, तर काही त्याला शरण जाऊन स्वतःचे मनोगत व्यक्त करणारे आहेत. तर काही त्याला खडसावून जाब विचारणारे आहेत तर काही त्याच्याशी सलगी करून प्रेम व्यक्त करणारे आहेत. तर काही ब्रह्मानंद लाभल्याने आनंद व्यक्त करणारे आहेत तर काही त्यापासून मिळत असलेली अनुभूती सांगणारे वा वर्णन करणारे आहेत. किंबहुना ह्या संसारात असे काय नाही ज्यावर तुकोबांकडून अभंग झालेले नाहीत. त्यांच्याकडून लौकिक आणि अलौकिक अशा सर्वच बाबींवर उत्स्फूर्तपणे अभंग रचले गेलेले असून परमार्थात प्रगती करण्यापासून ते संसार कसा करावा येथवर असा सर्वच विषयांवर त्यांनी तोंडसुख घेतलेले आहे असे म्हंटले तरी अतिशयोक्ति ठरणार नाही.