← मागील अभंग (93)
पुढील अभंग (95) →

अशांचे केव्हाही दर्शन न घडो...

Published on: 07 Oct 2025, 05:28 PM

परिस्थिती / संदर्भ:

ज्यांची बुद्धी स्थिर नसून जे भांडखोर असतात..

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ९४


शब्द नाही धीर । ज्याची बुद्धी
नाही स्थिर ।।
ह्यांचे न व्हावे दर्शन । खळा पंगती
भोजन ।।
संतास जो निंदी । अधम लोभासाठी
वंदी ।।
तुका म्हणे पोटी । भाव जया
आणिक होटीं ।।

अर्थ:
तुकाराम महाराज वरील अभंगात देवाला उद्देशून म्हणतात की हे देवा नारायणा, हे विठ्ठला मला त्या व्यक्तीशी देखील काहीएक संबंध नको आहे ज्याच्या तोंडाला धीर नसतो आणि ज्याची बुद्धी देखील स्थिर नसते.
किंबहुना अशा माणसाचे मला कधीही कोणत्याही काळीदेखील चुकूनही दर्शन न होवो अशीच माझी इच्छा आहे.
ते म्हणतात एवढेच नव्हे तर अशा दुर्जनासोबत, किंबहुना अशा खळासोबत माझा केव्हा संबंध येईल वा कधी गाठभेट पडेल अथवा कोणत्या सणा-समारंभाला यांच्यासोबत उठबैस होईल वा एखाद्या पंगतीला बसावे लागेल असे देखील घडू देऊ नकोस.
कारण असे लोक इतरांशी वाद घालण्यात सराईत असून तशा संधीच्या ते नेहमी मागावरच असतात आणि अखेरीस शोधूनच काढतात.
आणि एवढेच नव्हे तर अशी लोकं देखील समाजातील चांगल्या लोकांची निंदा-नालस्ती करणारे असतात, त्यांना त्रास देणारे असतात व शक्य त्या मार्गाने त्यांना छळतात.
परंतु एरव्ही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी मात्र अधम लोकांचे गोडवे गातात, त्यांना वंदन करतात. त्यांची पूजाच करतात.
त्यामुळे हे देवा अशा समाज कंटकांपासून देखील मला तू लांबच ठेवलेले बरे. ज्यांच्या पोटी एक भाव असतो आणि होटी मात्र नेहमी काही भलतेच असते.
कारण असे हे वाचाळवीर आणि ढोंगी माणसे निचाहून नीच असतात. स्वतःच्या लोभासाठी संतांची निंदा करण्यास देखील मागेपुढे पाहत नाहीत. परंतु तोच दुसरीकडे अधम लोकांचे तळवे चाटण्यास, त्यांचा उदो उद... Read More
← मागील अभंग (93)
पुढील अभंग (95) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!