तुकाराम महाराज म्हणतात मी देखील पूर्वी तुम्हा लोकांसारखाच या संसारात आकंठ बुडालो होतो. आणि या सांसाररूपी मृगजळाशी एकरूप झालो होतो. त्याची दिनरात सेवा करत होतो. किंबहुना तसे करण्यात धन्यताच मानत होतो.
परंतु मी हरिच्या जागरणाला, त्यांच्या कीर्तनाला काय जायला लागलो, माझी झोपच उडाली. माझे डोळेच उघडले. आणि कधी नव्हे ते मी भानावर आलो. किंबहुना माझी झोपच पळून गेली.
ते म्हणतात अशा या कीर्तनाच्या ठिकाणी वैष्णवांचे लोंढेच्या लोंढेच लोटलेले असतात, त्यांची तेथे मंदियाळीच असते. किंबहुना त्यांची तेथील उपस्थिती पाहून जणूकाही त्या जागेला त्यांचा भारच होत असावा अथवा वाटत असेल असे वाटावे. असो.
परंतु त्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या विठ्ठल नामाच्या अखंड जल्लोषाने, त्याच्या जयजयकाराने, किंबहुना त्या गर्जनेने कित्येक जन्म झोपी गेलेला मनुष्य सहज आणि लागलीच भानावर येतो, तात्काळ त्याची दृष्टी उघडून तो खडबडून जागाच होतो.
त्यामुळे मला देखील तशी खडबडून जाग आली नसती तरच नवल ठरले असते आणि मी देखील भ्रमातून भानावर आलो नसतो तर आश्चर्यकारक गोष्ट घडली असे म्हणावे लागले असते. असो.
तेव्हा अशा ठिकाणी मी उपस्थिती काय लावू लागलो वा हजेरी लावण्यास सुरुवात काय केली मला लागलीच कळून चुकले की आजवर मी खऱ्या अर्थाने झोपलो होतो, संसाररूपी मृगजळात अडकलो होतो आणि अशा या झोपेच्या आड माझ्या कडून दैनंदिन पातळीवर पापच घडत...
Read More
तुकाराम महाराज म्हणतात मी देखील पूर्वी तुम्हा लोकांसारखाच या संसारात आकंठ बुडालो होतो. आणि या सांसाररूपी मृगजळाशी एकरूप झालो होतो. त्याची दिनरात सेवा करत होतो. किंबहुना तसे करण्यात धन्यताच मानत होतो.
परंतु मी हरिच्या जागरणाला, त्यांच्या कीर्तनाला काय जायला लागलो, माझी झोपच उडाली. माझे डोळेच उघडले. आणि कधी नव्हे ते मी भानावर आलो. किंबहुना माझी झोपच पळून गेली.
ते म्हणतात अशा या कीर्तनाच्या ठिकाणी वैष्णवांचे लोंढेच्या लोंढेच लोटलेले असतात, त्यांची तेथे मंदियाळीच असते. किंबहुना त्यांची तेथील उपस्थिती पाहून जणूकाही त्या जागेला त्यांचा भारच होत असावा अथवा वाटत असेल असे वाटावे. असो.
परंतु त्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या विठ्ठल नामाच्या अखंड जल्लोषाने, त्याच्या जयजयकाराने, किंबहुना त्या गर्जनेने कित्येक जन्म झोपी गेलेला मनुष्य सहज आणि लागलीच भानावर येतो, तात्काळ त्याची दृष्टी उघडून तो खडबडून जागाच होतो.
त्यामुळे मला देखील तशी खडबडून जाग आली नसती तरच नवल ठरले असते आणि मी देखील भ्रमातून भानावर आलो नसतो तर आश्चर्यकारक गोष्ट घडली असे म्हणावे लागले असते. असो.
तेव्हा अशा ठिकाणी मी उपस्थिती काय लावू लागलो वा हजेरी लावण्यास सुरुवात काय केली मला लागलीच कळून चुकले की आजवर मी खऱ्या अर्थाने झोपलो होतो, संसाररूपी मृगजळात अडकलो होतो आणि अशा या झोपेच्या आड माझ्या कडून दैनंदिन पातळीवर पापच घडत होते.
नको नको त्या कर्मात माझे हात गुंतले होते. किंबहुना बरबरटलेच होते. निषिद्ध गोष्टींचे माझ्या कडून नित्य सेवन आणि आचरण घडत होते. मी जणूकाही पापाचा धनीच झालो होतो.
परंतु कोण जाणे कसे काय मी या हरिकीर्तनाला आलो आणि माझा या संसाराप्रती दृष्टिकोनच पालटून गेला आणि मी संपूर्णपणे भानावर आलो.
म्हणजे आजवर मी पूर्णपणे निद्रावस्थेतच होतो, परंतु आज मी खऱ्या अर्थाने जागृती अवस्थेत आलो आहे. खऱ्या अर्थाने माझे डोळे उघडलेले आहेत.
एवढेच नव्हे तर ते म्हणतात जेव्हा खऱ्या अर्थाने मनुष्य जागृतीत येतो तेव्हाच देवाची त्यावर कृपा होण्यास सुरुवात होते. तेव्हाच त्याला देवाचे दर्शन देखील घडते.
किंबहुना अशा भक्तांनाच देवाचे थेट मार्गदर्शन लाभून त्यांच्यावरच त्याच्या कृपेची छाया असते. म्हणजे त्यांच्या दिशेनेच खऱ्या अर्थाने देवाची कृपा वळत असते. ज्यामुळे, अशांनाच मग स्वहिताचा मार्ग दिसण्यास देखील सुरवात होते.
अभंग ८
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!