← मागील अभंग (6)
पुढील अभंग (8) →

स्वहित कसे साधावे?

Published on: 09 Sep 2025, 05:43 AM

परिस्थिती / संदर्भ:

आपल्या मनाला भक्ती करण्यास आवाहन करताना..

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ७


नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर
नाही देवे ।।
नाही तयावीण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल
रामकृष्णा ।।
देवापाशी मागे आवडीची भक्ती । विश्वासेंशी प्रीती
भावबळे ।।
तुका म्हणे मना सांगतो विचार । धरावा निर्धार
दिसेंदिस ।।

अर्थ:
स्वहितासाठी, उद्धारासाठी व देवाप्रति भाव बळकट करण्यासाठी तुकोबा आता आपल्या मनालाच आवाहन करताना म्हणतात की तुझ्याकडे गोड गळा नसला तरीही हरकत नाही अथवा तुला देवाने सुस्वर दिला नसेल तरीही चालेल.
कारण मुळात देव त्यासाठी भुकेलेला नाही व नसतो. किंबहुना त्याला त्याची किंचितही चाड नसते. त्यामुळे तू केवळ तुला येईल तसे वा जमेल तसे रामकृष्ण हरी म्हणावयास सुरुवात कर. आणि देवापाशी त्याच्या आवडीची भक्ति मागून घे.
म्हणजेच देवाला आवडेल, रुचेल व आनंद देऊन जाईल अशी भक्ति त्याच्याकडूनच मागून घे. जेणेकरून देवाला तुझ्यावर आणि तुझा देवावर विश्वास दृढ होण्यास मदत होईल.
कारण दोन जीवांचा एकमेकांवरील विश्वास जर दृढ झाला तरच दोघांमधील प्रीती वाढून मग त्याद्वारे दोघांमधील भाव देखील बळकट होण्यास मदत होते.
त्यामुळे हे माझ्या मना, मला तुला आता एवढेच सांगायचे आहे की तू केवळ आता एक भक्ति करण्यावर लक्ष्य केंद्रित कर. आणि इतर कोणत्याही गोष्टीचा विचार तू यापुढे आता तुझ्या मनात देखील आणू नकोस.
म्हणजेच काय तर यापुढे तुला आता एकच काम करायचे आहे आणि ते म्हणजे श्री हरीची भक्ति करणे वा तसे करण्याचा निर्धार करणे आणि घेतलेल्या निर्धारावर ठाम राहणे. आणि यापरते माझे तुझ्याकडे अन्य काहीही मागणे नाही.
अभंग ७ ... Read More
← मागील अभंग (6)
पुढील अभंग (8) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!