तुकाराम महाराज म्हणतात की हे माझ्या मना, हे माझ्या जिवा, आता आपल्याला भक्तिपंथाचा अवलंब करायचा आहे. आणि त्यासाठी मला तुझ्याकडून संपूर्ण साथीची अपेक्षा आहे. किंबहुना मला तुझी पूर्णच साथ हवी आहे.
त्यामुळे देवासाठी भक्तिगीते गाताना, त्याची स्तुति करताना तू मला, काकू न करता व कोणतेही कारण पुढे न करता, साथ द्यावीस अशी मी तुला विनवणी करत आहे.
म्हणजेच काय तर, तुझ्याकडे गोड गळा नसला तरीही चालेल अथवा तुला देवाने सुस्वर दिला नसेल तरीही काही हरकत नाही.
परंतु तू देवाचे नाम घेण्यास आता सुरुवात कर आणि तुला जमेल तसे रामकृष्णहरी म्हणावयास प्रारंभ कर. आणि देवापाशी त्याच्या आवडीची भक्ति मागून घे.
कारण देव मुळात त्यासाठी भुकेलेला नाही व नसतो. किंबहुना त्याला त्याची किंचितही चाड नसते.
किंबहुना एका भावापलीकडे त्यास काहीही नको असते. आणि इतर मायिक पदार्थ तर त्यास रुचत देखील नाहीत.
त्यामुळे तू केवळ तुला येईल तसे रामकृष्णहरि बोल. आणि त्यासोबत देवाला देखील आवडेल, रुचेल व आनंद देऊन जाईल अशी भक्ति त्याच्याकडूनच मागून घे. जेणेकरून देवाला तुझ्यावरील आणि तुझा देवावरील विश्वास दृढ होत जाईल.
कारण दोन जीवांचा एकमेकांवरील विश्वास जेव्हा दृढ होतो तेव्हाच दोघांमधील अंतर कमी होऊन एकमेकांप्रति असलेली प्रीती दुणावत जाते आणि त्याद्वारे दोघांमधील भाव देखील बळकट होण्यास मग मदत होते.
त्यामुळे हे माझ्या सख्या...
Read More
तुकाराम महाराज म्हणतात की हे माझ्या मना, हे माझ्या जिवा, आता आपल्याला भक्तिपंथाचा अवलंब करायचा आहे. आणि त्यासाठी मला तुझ्याकडून संपूर्ण साथीची अपेक्षा आहे. किंबहुना मला तुझी पूर्णच साथ हवी आहे.
त्यामुळे देवासाठी भक्तिगीते गाताना, त्याची स्तुति करताना तू मला, काकू न करता व कोणतेही कारण पुढे न करता, साथ द्यावीस अशी मी तुला विनवणी करत आहे.
म्हणजेच काय तर, तुझ्याकडे गोड गळा नसला तरीही चालेल अथवा तुला देवाने सुस्वर दिला नसेल तरीही काही हरकत नाही.
परंतु तू देवाचे नाम घेण्यास आता सुरुवात कर आणि तुला जमेल तसे रामकृष्णहरी म्हणावयास प्रारंभ कर. आणि देवापाशी त्याच्या आवडीची भक्ति मागून घे.
कारण देव मुळात त्यासाठी भुकेलेला नाही व नसतो. किंबहुना त्याला त्याची किंचितही चाड नसते.
किंबहुना एका भावापलीकडे त्यास काहीही नको असते. आणि इतर मायिक पदार्थ तर त्यास रुचत देखील नाहीत.
त्यामुळे तू केवळ तुला येईल तसे रामकृष्णहरि बोल. आणि त्यासोबत देवाला देखील आवडेल, रुचेल व आनंद देऊन जाईल अशी भक्ति त्याच्याकडूनच मागून घे. जेणेकरून देवाला तुझ्यावरील आणि तुझा देवावरील विश्वास दृढ होत जाईल.
कारण दोन जीवांचा एकमेकांवरील विश्वास जेव्हा दृढ होतो तेव्हाच दोघांमधील अंतर कमी होऊन एकमेकांप्रति असलेली प्रीती दुणावत जाते आणि त्याद्वारे दोघांमधील भाव देखील बळकट होण्यास मग मदत होते.
त्यामुळे हे माझ्या सख्या मला तुला आता एवढेच सांगायचे आहे की तू केवळ आता केवळ एक भक्ति करण्यावर तुझे लक्ष केंद्रित कर. आणि इतर कोणत्याही गोष्टीचा विचार तू यापुढे आता आणू देखील नकोस.
म्हणजेच काय तर यापुढे तुला आता एकच काम करायचे आहे आणि ते म्हणजे श्री हरीची भक्ति करणे वा तसे करण्याचा निर्धार करणे आणि घेतलेल्या निर्धारावर ठाम राहणे. आणि यापरते माझे तुझ्याकडे अन्य काहीही मागणे नाही.
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!