← मागील अभंग (47)
पुढील अभंग (49) →

अभंग क्रमांक: ४८


नव्हे आराणूक, संवसारा हाती । सर्व काळ चित्ती,
हाचि धंदा ।।
देवधर्म, सांदी पडिले सकळ । विषयी गोंधळ
गाजतसे ।।
रात्री दिस न पुरे, कुटुंबाचे समाधान । दुर्लभ दर्शन,
ईश्वराचे ।।
तुका म्हणे, आत्महत्यारे घातकी । थोर होते चुकी
नारायणी ।।

अर्थ:
तुकाराम महाराज पुढे सांगतात, “एवढे सांगूनही लोकांना कळत नाही हे पाहून अशांना जागवण्यासाठी व भानावर आणण्यासाठी मी पुनः एकदा सर्वांनाच कळवळ्याने सांगतो की निदान आता तरी तुम्ही सर्वांनी भानावर यावे आणि स्वहिताचा काहीतरी विचार करावा.
ते म्हणतात की, ‘मनुष्याला ह्या संसाराच्या हातून केव्हाही समाधान लाभत नाही, वा तो करत असलेल्या प्रपंचाकडून त्यास केव्हाही संपूर्ण सुख मिळत नाही आणि पूर्वी कधीही लाभले आहे असेही नाही.
तरीही त्यांची संसार करण्याची हौस मात्र कमी होत नाही आणि फिटतही नाही, आणि त्याचा जीव देखील काहिकेल्या हट्ट सोडत नाही.’
एवढेच नव्हे तर अशा ह्या संसाराकडून त्यांना क्षणभरदेखील विश्रांती लाभत नाही वा कोणेकाळी मिळाली आहे असे देखील नाही. उलट मनुष्य शोधत असलेला असा हा विसावा केव्हा त्याच्या पदरी आला आहे वा पुढे केव्हा येईल असेही घडत नाही.
कारण मुळात हा संसार असतोच तसा. म्हणजेच अशा ह्या संसाराची हीच गुण-वैशिष्ट्ये असून वा दोष-अवगुण असून त्याचा स्वभाव मुळातच हा तसाच असतो. किंबहुना असे म्हंटले तरीही वाउगे ठरणार नाही.
म्हणजेच मनुष्याने ह्या संसाराची कितीही प्रशंसा केली, त्याचे कितीही गोडवे गायले व त्याची कितीही सेवा केली किंवा त्याचे कितीही लाड पुरविले तरीही या संसाराचे आणि पर्यायाने त्याचे केव्हाही काडीचेही समाधान होत नाही व होताना देखील दिसत नाही.
आणि मुख्य म्हणजे त्याची एवढी कड... Read More
← मागील अभंग (47)
पुढील अभंग (49) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!