← मागील अभंग (297)
पुढील अभंग (299) →

भोगांचा माझ्यावर झालेला परिणाम

Published on: 01 Aug 2025, 05:45 PM

परिस्थिती / संदर्भ:

(संदर्भ: मी संसारातून बाहेर का पडलो. मी संसाराचा त्याग का केला आणि भक्तीपंथाला का लागलो?)

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: २९८


बाहेर पडलो आपुल्या कर्तव्ये । संसारासी जीवे
वेटाळिलो ।।
एकामध्ये एक नाही मिळो येत । ताक नवनीत
निवडिले ।।
जाली दोनी नामे एकाची मथनी । दुसरिया गुणी
वेगळाली ।।
तुका म्हणे दाखविल्या मुक्ताफळी । शिंपलेचि स्वस्थळी
खुंटलिया ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात असे हे भोग भोगून आणि त्यापायी या संसाराचा वीट येऊन माझ्याकडून आपोआपच या संसाराचा त्याग घडून आला.
म्हणजेच येथील सर्वच गोष्टी नाशिवंत असून इतर सर्व सुखं देखील नश्वर आणि खोटी आहेत हे एकदाचे कळून चुकले की पुन्हा या संसाराची गोडी लागत नाही.
आणि एकदा का हा बोध झाला वा एकदा का या ज्ञानाची उपरती झाली की मग कोणासही हे सहज शक्य होते.
एवढेच नव्हे तर एकदा का असे घडून आले की त्यानंतर मग कितीही प्रयत्नाने देखील पुन्हा माघारी फिरता येत नाही हे देखील जाणवल्यामुळे मी आपोआपच हयातून बाहेर पडलो.
ज्याप्रमाणे एकदा का मोती शिंपल्यातून बाहेर पडला की पुन्हा त्यात अडकत नाही किंवा एकदा का ताकातून नवनीत निवडिले वा बाहेर पडले की पुन्हा ते त्यात मिसळू शकत नाही अगदी त्याप्रमाणेच.
त्यामुळे आता पुन्हा माघारी फिरणे शक्यच नाही हे उमगल्यामुळे यातून बाहेर पडणेच शहाणपणाचे आहे किंबहुना हे माझे कर्तव्यच आहे हे ओळखून मी या संसारातून बाहेर पडलो. ... Read More
← मागील अभंग (297)
पुढील अभंग (299) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!