← मागील अभंग (291)
पुढील अभंग (293) →

पुनरूपी इंद्रियांच्या अधीन होऊ लागल्यावर

Published on: 27 Feb 2026, 11:02 AM

परिस्थिती / संदर्भ:

तुकोबा देवाला आता एकप्रकारे आवाहनच करत आहेत..

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: २९२


करा नारायणा । माझ्या दुखाची
खंडणा ।।
वृत्ती राखा पायापाशी । वस्ती धरून
मानसी ।।
पाळोनिया लळा । आता पाववावे
फळा ।।
तुका म्हणे दिन । त्यांचा हरतिया
सीण ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात हे देवा नारायणा, हे पांडुरंगा निदान आता तरी मला सहाय्य करा, आणि माझ्या इंद्रियांना आवर घालून माझ्या दुःखाची खंडणा करा. माझ्या या सैराट सुटलेल्या मनावर नियंत्रण प्रस्थापित करून निदान आता तरी माझ्या दुःखाचे निवारण करा.
म्हणजेच काय तर माझ्या या सैराट सुटलेल्या मनामुळे माझ्यावर कोसळू पाहत असलेल्या या भावी संकटापासून माझी मुक्तता करा. त्यापासून एकदाची माझी सुटका करून माझे संपूर्ण संरक्षण करा.
एवढेच नव्हे तर, अशा या माझ्या मनात तुम्ही कायमचे वस्तीलाच या. तेथे मुक्कामच ठोका. आणि तेथे वस्ती करून माझी सर्वेंद्रिये तुमच्या पायाशी बांधूनच टाका. व त्यांच्या सर्व वृत्ती तुम्ही तुमच्या चरणांशी राखून ठेवा.
एवढेच नव्हे तर, पुढे लाडाने-कोडाने माझे पालन-पोषण करा. प्रेमाने, लळेने मला पाळून माझा सांभाळ करा आणि माझ्या भक्तीचे फळ शक्य तितक्या लवकर माझ्या ओंजळीत टाका. माझ्या पदरी घाला.
म्हणजेच निदान आता तरी माझे मानस फळाला येईल असे काहीतरी करा. आणि तसे करून तुम्ही खरंच दिनांचे दुख दूर करता, दिन-दुबळ्यांचा सीण हरता, त्यांचा संसाराचा थकवा घालवता हे वचन सत्य करून दाखवा.
आणि असे करून मला देखील त्वरेने त्याची प्रचिती द्या. म्हणजेच काय तर लवकरात लवकर माझ्यावर देखील तुम्ही तुमची मेहेरजनजर फिरवून, तुमची कृपादृष्टी फेरून, तुमच्या कृपेची अनुभूति घेऊ द्या.
म्हणजेच काय तर, सर्वदूर... Read More
← मागील अभंग (291)
पुढील अभंग (293) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!