← मागील अभंग (235)
पुढील अभंग (237) →

भोगांचा माझ्यावर झालेला परिणाम

Published on: 01 Aug 2025, 05:45 PM

परिस्थिती / संदर्भ:

"...अशारितीने ज्ञानाची उपरती झाल्याने, येथे ह्या संसारात खरे काय व खोटे काय हे आम्हाला कळून चुकले आहे. त्यामुळे आमचे बोलणे देखील आता खुंटले असून आमची वाणी आम्ही देवाला, अनंताला अर्पणच करून टाकली आहे."

पहा पुढील अभंगात ते काय म्हणतात ते...

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: २३६


आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण बडबड
करी वांयां ।।
सुख तें चि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें
कळों आलें ।।
तुका म्हणे वाचा वाईली अनंता । बोलायाचें आतां
काम नाहीं ।।

अर्थ:
एवढेच नव्हे तर याव्यतिरिक्त आता आम्हाला कसलीही आणि कशाचीही चाड उरलेली नाही. आमच्या मनी देखील कोणत्याही प्रकारची इच्छा व आकांशा राहिलेल्या नाहीत.
त्यामुळे यापुढे आम्ही वाया बडबड देखील करणार नाही. कारण खरे काय ते kaलुन आल्यावर यापुढे व्यर्थ बडबड आता कोण करत राहील?
एवढेच नव्हे तर ह्या संसारात आपण ज्यास खरे सुख मानतो अथवा असे म्हणतो ते खरे सुख नसून तेच खरे दुःख असून तेच मनुष्याच्या अहिताला कारणीभूत ठरते हे देहकिल आम्हांस कळून चुकले आहे,
त्यामुळे खरे पापपुण्य कोणते आणि कशातून लाभते हे आता आम्हांस चांगलेच उमगून आहे आणि त्यामुळे आम्ही आता खऱ्या अर्थाने भानावर आलो आहोत.
आणि म्हणूनच आमच्या जीवाभावासकट आम्ही आमची वाणी देवास वाहिली आहे, आणि काही बोलायचे झाल्यास आम्ही आमच्या वाणीने एका देवाशिवाय, त्याच्या नामाशिवाय अन्य काहीही बोलत नाही, त्यामुळे आमच्या वाणीला इतर काही बोलण्याचा आता प्रश्नच उरलेला नाही.... Read More
← मागील अभंग (235)
पुढील अभंग (237) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!