← मागील अभंग (221)
पुढील अभंग (223) →

इतरांना देखील भक्तीसाठी आवाहन करताना..

Published on: 14 Sep 2025, 02:00 PM

परिस्थिती / संदर्भ:

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: २२२


आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी ।
बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ॥
झाडू संतांचे मारग । आडरानी भरले जग ।
उच्छीष्टाचा भाग । शेष उरला तो सेवू ॥
अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्दज्ञाने ।
विषयलोभी मने । साधने बुडविली ॥
पिटू भक्तीचा डांगोरा । कळीकाळासी दरारा ।
तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ॥

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी या पृथ्वीलोकात, या इहलोकात याच कारणासाठी आलो आहोत, म्हणजे या एकाच कारणासाठी आलो आहोत आणि ते म्हणजे आपल्या संत-सज्जनांनी, पूर्वी होऊन गेलेल्या साधू-संतांनी जे सांगितले आहे ते खऱ्या भावाने आचरण करून दाखवण्यासाठी. जे ते बोलून गेले आहेत ते साचभावाने वर्तन करण्यासाठी. जेणेकरून त्यातून इतरांना देखील मार्गदशन मिळेल व त्यांना स्वहिताचा मार्ग देखील सापडेल.
कारण ते म्हणतात जेव्हा आम्ही येथे आलो, तेव्हा पाहतो तर काय येथे सर्व जग रिकामे पडले असून सर्वजण आडरानात जाऊन वस्ती करू लागले आहेत. त्यांनी सरळसोट जाण्याचा मार्ग व पर्याय केव्हाच सोडून दिला आहे. त्यांचे नको नको त्या कामात हात गुंतले आहेत. निषिद्ध कर्मांनांच ते स्वधर्म समजू लागले आहेत. आणि तसे करण्यातच त्यांना धन्यता वाटू लागली आहे.
म्हणजेच त्यांनी सरळसोट मार्गाने जाणे केव्हाच सोडून दिले आहे आणि आडमार्गाने जाणेच त्यांना पसंत पडू लागेले आहे. एवढेच नव्हे तर त्यातून पुनरूपी कसे बाहेर पडावे हे कित्येकांना आता ठाऊकच नसल्याने ते सर्वजण आता त्यातच गुंतून पडले आहेत आणि त्यांना खऱ्या उद्दिष्टाचा देखील विसर पडला आहे.
तुकोबा म्हणतात अशांना कित्येक काळ कोणीही वाली न उरल्याने वा मार्गदर्शक न राहिल्याने हे असे घडून आले आहे.
त्यामुळे पूर्वी संतांनी दाखवलेली वाट आता ओसाड पडली आहे. त्याचा कित्येक युगे कोणीही वा... Read More
← मागील अभंग (221)
पुढील अभंग (223) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!