← मागील अभंग (1)
पुढील अभंग (3) →

स्वहितासाठी, परमार्थ मार्गात प्रगती करण्यासाठी आणि अंती संपूर्ण उद्धार घडून येण्यासाठी

Published on: 11 Jul 2025, 06:03 AM

परिस्थिती / संदर्भ:

ज्ञानाची उपरती झाल्यावर तुकोबा देवाकडे आता एकच मागणे मागत आहेत आणि ते म्हणजे माझ्या सर्वेद्रियांच्या वृत्ती आता तुझ्या पायाशीच खिळून राहो..

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: २


समचरणदृष्टी विटेवरि साजिरी । तेथे माझी हरी
वृत्ति राहो ।।
आणिक नलगे मायिक पदार्थ । तेथे माझे आर्त
नको देवा ।।
ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी । तेथे चित्त झणी
जडो देसी ।।
तुका म्हणे त्याचे कळले आम्हां वर्म । जे जे
कर्मधर्म नाशिवंत ।।

अर्थ:
तुकोबा म्हणतात हे देवा पांडुरंगा, हे नारायणा तुझे विटेवर ठेवलेले समचरण अतिशय साजरे असून जे नित्य त्या विटेची शोभा वाढवत आहेत, अशा ह्या सुंदर ठिकाणीच यापुढे माझ्या इंद्रियांच्या सर्व वृत्ती सदैव एकवटून राहोत.
आणि ह्याव्यतिरिक्त हे देवा मला तुझ्याकडून अन्य काहीही नको. कारण यापुढे मला इतर कोणत्याही मायिक पदार्थात आणि सांसारिक गोष्टीत रस उरलेला नाही, त्यामुळे तेथे आता हे देवा माझे आर्त वृद्धिंगत होईल असे होऊ देऊ नकोस.
कारण लौकिक गोष्टींमुळे केवळ आणि केवळ दुःखच पदरी येते हे मला आता चांगलेच उमगले असून अशा ह्या लौकिक गोष्टींपासून तू मला आता लांबच ठेव. हवे तर माझे तुझ्याकडे हे प्रामाणिक मागणेच आहे असे समज.
म्हणजेच काय तर लौकिक गोष्टी मनुष्याच्या दुःखालाच कारणीभूत ठरतात हे सत्य तुझ्या कृपेनेच मला ठाऊक झाल्यामुळे त्यापासून तू माझे यापुढे संपूर्ण संरक्षणच कर असे माझे तुला सांगणे आहे. किंबहुना अशी माझी तुला कळकळीची विनंतीच आहे.
एवढेच नव्हे तर येथील ब्रह्मादीक पदे देखील खऱ्या अर्थाने दुःखाची शिराणीच आहेत व असतात आणि मनुष्याच्या ऱ्हासालाच अधिक कारणीभूत ठरतात. वा त्यास अधिकच हातभार लावतात हे सत्यदेखील आम्हाला झ्या कृपेनेच कळून चुकले आहे. त्यामुळे अशा गोष्टींपासून देखील तू माझे रक्षण कर.
त्याप्रमाणेच अखंड नामस्मरण केल्याने व त्याद्वारे तुझी सेवा घडल्याने माझ्याठायी पुण्याचा संचय होईल व त्याब... Read More
← मागील अभंग (1)
पुढील अभंग (3) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!