← मागील अभंग (15)
पुढील अभंग (17) →

ज्ञान व मार्गदर्शन

Published on: 08 Oct 2025, 05:55 PM

परिस्थिती / संदर्भ:

ज्याप्रमाणे अवगुणी लोकांची अंती नेहमी फजितीच होते त्याप्रमाणेच भक्तीत भाव नसलेलयांची देखील तशीच गत होते.

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: १६


अवगुणांचे हाती । आहे अवघीच
फजिती ।।
नाही पात्रासवे चाड । प्रमाण ते
फिके गोड ।।
विष तांब्या वाटी । भरली लाउ नये
होठी ।।
तुका म्हणे भाव । शुद्ध बरा
सोंग वाव ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे अवगुणी लोकांची अंती फजितीच होऊन त्यांच्या हाती शेवटी नामुष्कीच येते, त्याप्रमाणेच भक्तीचे सोंग घेणाऱ्यांचे देखील काहीशी तशीच परिस्थिति होते. किंबहुना त्यांची देखील अंती काहीशी तीच गत होऊ तशीच अवस्था होते.
कारण मनी भाव नसताना केवळ मान मिळावा म्हणून ते भक्तीचा जो काही आव आणतात त्याने अंती त्यांच्या पदरी केवळ निराशाच येते. एवढेच नव्हे तर चांगलीच विटंबना देखील होते.
कारण ते म्हणतात येथे भक्तिमार्गात सर्वकाही एक भावाशीच निगडीत असल्याने नेमका तोच नसेल तर केवळ बाह्य दीखाव्याला काहीही अर्थ नसून त्यास काडीचेही मोल नसते.
ते पुढे म्हणतात ज्याप्रमाणे एखाद्या पात्रात कोणता पदार्थ आहे अथवा कोणता रस आहे ह्याच्याशी त्या भांड्याचा काहीही संबंध नसतो वा नसावा.
कारण त्या भांड्यातील पदार्थाला चव आहे की नाही किंवा त्याचे प्रमाण किती फिके आहे वा किती गोड आहे त्यावर त्यातील रस वा पदार्थाची योग्यता ठरत असते आणि बहुधा सर्वांना देखील त्याच्याशीच चाड असते.
एवढेच नव्हे तर बाहेरील भांड मग सोन्याचे असुदेत वा चांदीचे. किंबहुना अशा भांड्यात मग विष देखील असले तर मग कोणीही वेडा देखील मग त्यास तोंड लावत नाही वा लावू नये हे कोणासही सांगावे लागत नाही.
अगदी त्याप्रमाणेच भक्तीचे देखील असते.
देवाला देखील भक्ताच्या बाह्यरुपाशी केव्हाच काही घेणेदेणे नसते. त्यास केवळ तो करत अस... Read More
← मागील अभंग (15)
पुढील अभंग (17) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!