तुकाराम महाराज म्हणतात ज्या कोणाला येथे नरदेह लाभला आहे त्याने ह्या भक्तीरसरूपी देवाच्या प्रसादाचा संपूर्ण लाभ घ्यावा. म्हणजेच भक्तिमार्गाला लागून स्वतःचा उद्धार करून घ्यावा व उचित असे मनुष्य जन्माचे हित पदरी पाडून घ्यावे.
कारण हा प्रसाद ब्रह्मादिकांना देखील उपलब्द्ध नसून केवळ आणि केवळ नरयोनीत जन्माला आलेल्यांनाच त्याचा लाभ घेता येतो.
कारण ब्रह्मादि देवांना भक्ती करण्याचा अधिकार नसल्याने हा प्रसाद (हा भक्तीरस) त्यांना लाभत नसून त्यांच्यासाठी त्याचे साधे उच्छिष्ट (उष्टे) देखील दुर्लभ आहे...
त्यामुळे ह्याउपर अधिक वेळ न दवडता सर्वांनी शक्य तितक्या लवकर भक्तिमार्गाला लागून स्वतःचे हित साधून घ्यावे.
एवढेच नव्हे तर अशा ह्या ब्रह्मरसाचे सेवन करण्याचा येथे सर्वाना समान अधिकार असून एखादा इच्छादानी (इच्छुक) असो किंवा समाजात समस्त गोष्टीं लाभलेला एखादा समर्थ असो... येथील सर्वजण याचे अधिकारी असून या इहलोकातील प्रत्येकास त्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे.
म्हणजेच अशा या लाभाचा भुलकोवरील प्रत्येक जीवजंतु संपूर्ण अधिकारी असून सर्वांसाठी हे पात्र ओसंडून वाहत आहे...
व आनंदाची बाब म्हणजे हा ब्रह्मरस, हा आनंद कधीकाळी सरेल किंवा कमी होईल किंवा यात किंचितदेखील घट होईल असे घडत नाही...
उलट जितका तो घ्यावा तितका तो अजून घेत राहावा असेच वाटत राहते, म्हणजेच जेवढे ह्या भोजनाचे कवळ घ्यावे तेवढे ...
Read More
तुकाराम महाराज म्हणतात ज्या कोणाला येथे नरदेह लाभला आहे त्याने ह्या भक्तीरसरूपी देवाच्या प्रसादाचा संपूर्ण लाभ घ्यावा. म्हणजेच भक्तिमार्गाला लागून स्वतःचा उद्धार करून घ्यावा व उचित असे मनुष्य जन्माचे हित पदरी पाडून घ्यावे.
कारण हा प्रसाद ब्रह्मादिकांना देखील उपलब्द्ध नसून केवळ आणि केवळ नरयोनीत जन्माला आलेल्यांनाच त्याचा लाभ घेता येतो.
कारण ब्रह्मादि देवांना भक्ती करण्याचा अधिकार नसल्याने हा प्रसाद (हा भक्तीरस) त्यांना लाभत नसून त्यांच्यासाठी त्याचे साधे उच्छिष्ट (उष्टे) देखील दुर्लभ आहे...
त्यामुळे ह्याउपर अधिक वेळ न दवडता सर्वांनी शक्य तितक्या लवकर भक्तिमार्गाला लागून स्वतःचे हित साधून घ्यावे.
एवढेच नव्हे तर अशा ह्या ब्रह्मरसाचे सेवन करण्याचा येथे सर्वाना समान अधिकार असून एखादा इच्छादानी (इच्छुक) असो किंवा समाजात समस्त गोष्टीं लाभलेला एखादा समर्थ असो... येथील सर्वजण याचे अधिकारी असून या इहलोकातील प्रत्येकास त्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे.
म्हणजेच अशा या लाभाचा भुलकोवरील प्रत्येक जीवजंतु संपूर्ण अधिकारी असून सर्वांसाठी हे पात्र ओसंडून वाहत आहे...
व आनंदाची बाब म्हणजे हा ब्रह्मरस, हा आनंद कधीकाळी सरेल किंवा कमी होईल किंवा यात किंचितदेखील घट होईल असे घडत नाही...
उलट जितका तो घ्यावा तितका तो अजून घेत राहावा असेच वाटत राहते, म्हणजेच जेवढे ह्या भोजनाचे कवळ घ्यावे तेवढे अधिकाधिक घेतच राहावे असे वाटते...
आणि मुख्य म्हणजे असा हा अनमोल आणि निरुपम ब्रह्मरस, असा हा पाक देवी लक्ष्मी स्वतःच्या हाताने वाटत असून तिच्या संगतीला रिद्धीसिद्धि कामारी(दासी) म्हणून काम करत आहेत, त्यामुळे अशा ह्या ब्रह्मरसाला तुम्ही नाकारू नये, त्याचा वीट मानू नये अशी मे तुम्हा सर्वांना आता गळच घालतो...
उलट आशा ह्या प्रसादाचे तुम्ही सर्वांनी पोट भरेपर्यंत आणि मन निवेपर्यंत सेवन करावे अशी माझी तुम्हां सर्वांना विनंती आहे...
कारण जो कोणी येथे या भक्तीरसात डुंबतो, त्याचे सेवन करतो,(म्हणजेच जो कोणी श्रीहरिची भक्ती करतो), त्याचे श्री हरि मग सर्व आर्त पुरवतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो आणि त्याची सदैव पाठ राखण करून त्यास संपूर्ण संरक्षण प्रदान करतो...
(आणि अखेरीस ह्या भक्ती(ब्रह्म)रसा सोबत भक्ताला रिद्धीसिद्धि देखील अनायासे प्राप्त होतात..)
अभंग १५
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!