तुकाराम महाराज म्हणतात हे देवा पांडुरंगा, हे नारायणा, तुझ्याशी अशारितीने एकरूप झाल्याने तुझे सर्वकाही आता आम्हांला लाभत आहे आणि हळूहळू आम्ही देखील तुझ्यासारखेच होत आहोत. तेव्हा तुझ्या आणि माझ्यात पुन्हा यापुढे दुजाभाव होऊ देऊ नकोस.
कारण तसे झाल्यास आम्ही ते आता सहन करू शकणार नाही. किंबहुना यापुढे ते आता शक्यच नाही.
कारण आम्ही आता आमचे राहिलेलो नाही. त्यामुळे यापुढे आमचे आता माघारी फिरणे नाही. किंबहुना ती एक आता अशक्यप्राय गोष्ट झालेली असून आमचे मनच आम्हाला तशी ग्वाही देत आहे.
कारण ते म्हणतात तुझ्याशी आम्ही आता असेकाही एकरूप झालो आहोत की आम्हाला सर्वत्र आता तूच एक दिसू लागला असून आम्हाला सर्वत्र एक तुझीच पाऊले दिसत आहेत.
म्हणजेच जेथे नजर फिरवावी तेथे आम्हाला केवळ तुझ्याच पाऊलांच्या खुणा दिसत असून सर्वत्र आम्हाला एक तुझाच भास होतो आहे.
एवढेच नव्हे तर हे संपूर्ण त्रिभुवनच आम्हासाठी तुझ्या पाऊलांनी भरून गेले असून तुझ्या अस्तित्वानेच व्यापून गेले आहे असे माझ्या मनाचे झाले आहे. आणि त्यामुळेच माझे हे मनोगत आम्हाला तुला सांगणे भाग पडत आहे.
म्हणजेच या संपूर्ण त्रिभुवनात आम्हाला एक तुझीच प्रचिती येत असून सर्वत्र एक तुझाच संचार झालेला आहे अथवा तूच सर्वत्र भरून राहीला आहेस ह्याची हळूहळू अनुभूतीच येऊ लागली आहे.
आणि अशी माझ्या मनाची अवस्था झालेली असताना वा येथवर माझ्या मनाची गत झ...
Read More
तुकाराम महाराज म्हणतात हे देवा पांडुरंगा, हे नारायणा, तुझ्याशी अशारितीने एकरूप झाल्याने तुझे सर्वकाही आता आम्हांला लाभत आहे आणि हळूहळू आम्ही देखील तुझ्यासारखेच होत आहोत. तेव्हा तुझ्या आणि माझ्यात पुन्हा यापुढे दुजाभाव होऊ देऊ नकोस.
कारण तसे झाल्यास आम्ही ते आता सहन करू शकणार नाही. किंबहुना यापुढे ते आता शक्यच नाही.
कारण आम्ही आता आमचे राहिलेलो नाही. त्यामुळे यापुढे आमचे आता माघारी फिरणे नाही. किंबहुना ती एक आता अशक्यप्राय गोष्ट झालेली असून आमचे मनच आम्हाला तशी ग्वाही देत आहे.
कारण ते म्हणतात तुझ्याशी आम्ही आता असेकाही एकरूप झालो आहोत की आम्हाला सर्वत्र आता तूच एक दिसू लागला असून आम्हाला सर्वत्र एक तुझीच पाऊले दिसत आहेत.
म्हणजेच जेथे नजर फिरवावी तेथे आम्हाला केवळ तुझ्याच पाऊलांच्या खुणा दिसत असून सर्वत्र आम्हाला एक तुझाच भास होतो आहे.
एवढेच नव्हे तर हे संपूर्ण त्रिभुवनच आम्हासाठी तुझ्या पाऊलांनी भरून गेले असून तुझ्या अस्तित्वानेच व्यापून गेले आहे असे माझ्या मनाचे झाले आहे. आणि त्यामुळेच माझे हे मनोगत आम्हाला तुला सांगणे भाग पडत आहे.
म्हणजेच या संपूर्ण त्रिभुवनात आम्हाला एक तुझीच प्रचिती येत असून सर्वत्र एक तुझाच संचार झालेला आहे अथवा तूच सर्वत्र भरून राहीला आहेस ह्याची हळूहळू अनुभूतीच येऊ लागली आहे.
आणि अशी माझ्या मनाची अवस्था झालेली असताना वा येथवर माझ्या मनाची गत झालेली असताना अशा मनस्थितित आम्हाला टाकणे वा आमचा त्याग करणे तुला शोभणारे नाही.
त्यामुळे यापुढे तू माझा चुकूनही अव्हेर करू नकोस वा तसे करण्याचा साधा विचारही करू नकोस. एवढेच नव्हे तर आम्हाला तुझ्यापासून केव्हाही दूर लोटू नकोस. व तसा केव्हा प्रयत्नही करू नकोस.
म्हणजेच तुझ्या आणि माझ्यात केव्हा अंतर पडेल असे यापुढे होऊ देऊ नकोस वा तसे वागू देखील नकोस. किंबहुना कोणत्याही प्रकारे आपल्यात दुरावा निर्माण होईल वा द्वैतभाव उत्पन्न होईल असे देखील कदापि घडू देऊ नकोस.
त्यामुळे येथील जे लोक अजूनही भेदाभेद करण्यात अडकले आहेत किंवा तसा वाद घालण्यात गुंतले आहेत ते अद्याप भ्रमात जगत आहेत. तू खरंच अस्तित्वात आहेस की नाही ते अजून याच फंदात अडकले आहेत.
त्यामुळे यापुढे माझा त्यांच्याशी काही संबंध येईल अथवा कोणत्या तरी निमित्ताने आम्हाला त्यांच्याशी वाद घालावा लागेल अशी माझ्यावर निदान यापुढे तरी पाळी येऊ देऊ नकोस.
कारण ते सर्व निरर्थक असून अंती वेळेचा अपव्यय करणारे ठरेल हे आम्हाला आता चांगलेच कळून चुकले आहे. त्यामुळे यापुढे आम्हाला अशी माणसे भेटूच देऊ नकोस.
तुकोबाराय शेवटी म्हणतात कारण आम्हाला आता हे देखील स्पष्ट दिसू लागले आहे की तू येथे चराचरात भरून राहीला आहेस. इवल्याशा अणूमध्ये देखील तुझे अस्तित्व असून अफाट अशा या नभामध्ये देखील तू भरून राहिला आहेस.
किंबहुना अशा या अचाट नभाहून तू कितीतरी पटीने वाड(मोठा) आहेस. किंबहुना येथे अशी कोणती गोष्ट आहे ज्यात तू नाहीस.
आणि हे केवळ आमचे पुस्तकी ज्ञान नसून आम्हाला हळूहळू याची प्रचितीच येऊ लागली आहे.
किंबहुना हे सर्व आम्हाला होत असलेल्या ज्ञानाच्या उपरती मुळेच घडून येते आहे आणि त्यासोबत येत असलेल्या अनुभूति मुळे तसे दिसू आणि जाणवू लागले आहे.
अभंग १२
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!