सर्व सुखात लोळत असलेली एक स्त्री एकदा आपल्या गोहास(पतीस) म्हणते की तुमचे बाबा माझ्याकडे लक्षच नाही. तुम्ही माझे दुःख नेणतच नाहीत, जाणतच नाही. किंबहुना तुम्हाला ते दिसूनही तुम्ही तेथे दुर्लक्ष करत असता.
मी किती दुःखात दिवस कंठत आहे वा त्रासात जगत आहे ते तुम्हास मी सांगितल्या शिवाय कळणारच नाही.
त्यामुळे आज मी तुम्हाला स्वतःहून माझी (राम) कहाणी सांगणार आहे. .
ती सांगू लागते की मला अखंड पोटाची व्यथा असते. सतत माझ्या पोटात काही ना काही कारणाने दुखत असते. म्हणून माझ्या पोटदुखीवर उपाय आणि औषध म्हणून मला वैद्यबुवांनी पथ्यात दूधभात खाण्यास सल्ला दिला आहे आणि त्यावर भरपूर साखर आणि तूप घालण्यास सांगितले आहे.
दुपारच्या प्रहरी(वेळी) तर मला मला विचित्रच लहरी येतात. ज्यामुळे मग मला शुद्धच राहत नाही व चक्कर येऊ लागते. त्यामुळे मला मग सतत झोप घ्यावीशी वाटते. अंथरूणात पडून राहवेसे वाटते.
परंतु त्यात देखील मला व्यवस्थत झोप लागत नाही. कारण त्यावर असलेली गादी मऊसार नाही. त्यामुळे मला त्यावर फुले घालून निजावे लागते.
आणि मुलांचे विचाराल तर लहान मुले मला मुळातच आवडत नाही. त्यामुळे ती जवळ आलेली देखील मला सहन होत नाही.
एवढेच नव्हे तर माझ्या भाळी (कपाळी) नेहमी शूळ उठलेले असते. मला डोकेदुखिचा देखील भयंकर त्रास आहे, त्यामुळे त्यावर औषध म्हणून मला संपूर्ण कपाळासकट सर्वांगाला चंदनाचा लेप लावावा लाग...
Read More
सर्व सुखात लोळत असलेली एक स्त्री एकदा आपल्या गोहास(पतीस) म्हणते की तुमचे बाबा माझ्याकडे लक्षच नाही. तुम्ही माझे दुःख नेणतच नाहीत, जाणतच नाही. किंबहुना तुम्हाला ते दिसूनही तुम्ही तेथे दुर्लक्ष करत असता.
मी किती दुःखात दिवस कंठत आहे वा त्रासात जगत आहे ते तुम्हास मी सांगितल्या शिवाय कळणारच नाही.
त्यामुळे आज मी तुम्हाला स्वतःहून माझी (राम) कहाणी सांगणार आहे. .
ती सांगू लागते की मला अखंड पोटाची व्यथा असते. सतत माझ्या पोटात काही ना काही कारणाने दुखत असते. म्हणून माझ्या पोटदुखीवर उपाय आणि औषध म्हणून मला वैद्यबुवांनी पथ्यात दूधभात खाण्यास सल्ला दिला आहे आणि त्यावर भरपूर साखर आणि तूप घालण्यास सांगितले आहे.
दुपारच्या प्रहरी(वेळी) तर मला मला विचित्रच लहरी येतात. ज्यामुळे मग मला शुद्धच राहत नाही व चक्कर येऊ लागते. त्यामुळे मला मग सतत झोप घ्यावीशी वाटते. अंथरूणात पडून राहवेसे वाटते.
परंतु त्यात देखील मला व्यवस्थत झोप लागत नाही. कारण त्यावर असलेली गादी मऊसार नाही. त्यामुळे मला त्यावर फुले घालून निजावे लागते.
आणि मुलांचे विचाराल तर लहान मुले मला मुळातच आवडत नाही. त्यामुळे ती जवळ आलेली देखील मला सहन होत नाही.
एवढेच नव्हे तर माझ्या भाळी (कपाळी) नेहमी शूळ उठलेले असते. मला डोकेदुखिचा देखील भयंकर त्रास आहे, त्यामुळे त्यावर औषध म्हणून मला संपूर्ण कपाळासकट सर्वांगाला चंदनाचा लेप लावावा लागत.
तसेच मला निकृष्ट, निपट(कमी दर्जाचे) अन्न चालत नाही. ते मला पचतच नाही. त्याला तुम्ही माझ्यासाठी वेगळा तीन पायली गव्हाचा सांजा आणत जा.
आणि हो, अजून एक सांगायचे राहिले.
गेल्या वारी तुम्ही माझ्यासाठी जी साडेदहा शेर साखर आणली होती, ती केव्हाच संपली. ती मला सात दिवस देखील धड पुरली नाही. त्यामुळे माझ्यावर पुन्हा साधे सुधे अन्न खाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यावेळी जरा अधिक आणा.
ती पुढे म्हणते की तुम्ही पाहताय ना आपल्या डोळ्यांनी की माझी काय अवस्था झाली आहे ते. पहा मी कशी पार सुकून गेली आहे ते. माझे हाड-मास गळून माझे पाठ-पोट एक झाले आहे.
तरीही तुम्ही अजून माझ्याकडे कानाडोळा करत आहात. माझ्या दुखाकडे लक्ष देत नाही करत आहात. तुम्हाला अजूनही कसे जाणवत आणि दिसत नाही आणि माझ्या प्रती दया येत नाही.
तुकोबा शेवटी म्हणतात आपल्यावर जीव लावणारा, प्रेम करणारा नवरा लाभला आहे हे ठाऊक असल्यानेच ती त्यास असे छळत राहते व असे सर्व खोटे-नाटे सांगून त्यास दोषी असल्याची भावना देते. व त्याच्या मनाला टोंचणी लागून राहील असे कथन करते.
आणि ही तिचा नवरा देखील तिच्या प्रेमात वेडा असल्याने तिच्या होला हो करत राहतो. तिच्या प्रेमात पुरता बुडाला असल्यामुळे वा आंधळा झाल्याने ती जे म्हणेल त्यावर विश्वास ठेवत राहतो.
परंतु तुकोबा शेवटी म्हणतात अशा लोकांची गय करू नये व ह्यांच्यावर दया देखील दाखवू नये.
कारण अशी माणसे स्वतःच स्वतःची आजन्म फसवणूक करत असतात. जीवंत असताना स्वतःचे गाढव करून घेतात व अयोग्य मार्गाने जाऊन मेल्यावर देखील मग नरकातच जातात.
अभंग ११
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!