← मागील अभंग (35)
पुढील अभंग (37) →

स्वहित कसे साधावे?

Published on: 29 Sep 2025, 05:43 AM

परिस्थिती / संदर्भ:

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ३६


पराविया नारी माउली समान । मानिलिया
धन काय वेंचे ।।

न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष । काय तुमचे
वेचे सांगा ।।

बैसलिये ठायी म्हणता राम राम । काय होय श्रम
ऐसे सांगा ।।

संतांच्या वचनी मानिता विश्वास । काय तुमचे यास
वेचे सांगा ।।

खरे बोलता काय लागती सायास । काय वेचे यास
ऐसे सांगा ।।

तुका म्हणे देव जोडे याजसाठी । आणिक ते आटी न
लगे काही ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात की मनुष्याने जर दुसऱ्याच्या स्त्रीला किंवा अन्य कोणत्याही बाईला आईसमान मानले असता त्याचे किती धन खर्च होणार आहे की काही आर्थिक नुकसान होणार आहे का?
तसेच दुसऱ्याची निंदा नाही केली, त्यांनी कमावलेल्या द्रव्याचा अभिलाष नाही ठेवला किंवा हाव नाही धरली तर त्यासाठी देखील तुमचे काही खर्च होणार आहे का?
ते पुढे म्हणतात एकाच जागी बसून जर 'राम नाम' घ्यायचे असेल तर त्यासाठी देखील कष्ट पडतात का? किंवा संतांनी सांगितलेल्या गोष्टींवर जर तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवलात, त्यांच्या वचनांवर श्रद्धा ठेवली असता तुमचे नेमके काय खर्च होणार आहे?
ते म्हणतात एवढेच नव्हे तर नुसते खरे जरी बोलतात तरी त्यास देखील काही वेचावे लागते का किंवा काही श्रम पडतात का?
तुकोबाराय शेवटी म्हणतात की ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत परंतु हेच लोकं बहुदा पाळताना दिसत नाही.
परंतु ते म्हणतात ह्याच जर गोष्टींचे मनुष्याने कर्तव्य समजून पालन केले तर ह्यानेच तुम्ही देव जोडू शकाल, त्याला प्राप्त करून घेऊ शकाल कारण हे सोडून त्यासाठी इतर कोणत्याही गोष्टींचे प्रयत्न करावे लागतच नाही.
अभंग ३६... Read More
← मागील अभंग (35)
पुढील अभंग (37) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!