तुकाराम महाराज म्हणतात हे देवा नारायणा, हे पांडुरंगा ज्याप्रमाणे कल्पतरुचे झाड दाराशी आलेल्या याचकाचा कधीही अव्हेर करीत नाही, त्यास केव्हाही विन्मुख होत नाही, त्याकडे केव्हाही पाठ फिरवत नाही आणि वर त्यास कधीही रिकाम्या हाती माघारी धाडत नाही..
त्याप्रमाणेच तुमचे देखील वर्तन असावयास हवे. कारण तुम्ही देखील त्या कल्पतरु वृक्षाप्रमाणेच एक आहात. नव्हे, कल्पतरुच आहात. किंबहुना तुम्ही त्याहूनही श्रेष्ठ आहात, सर्वात सर्वोत्तम आहात. तरीदेखील तुम्ही तुमचा धर्म विसरता आहात.
म्हणजेच ज्याप्रमाणे कल्पतरुचे झाड आपला धर्म, आपले कर्तव्य विसरत नाही आणि परिस देखील आपले कर्तव्य संपूर्णपणे जाणून आहे, त्याप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या कर्तव्याप्रति दक्ष असणे गरजेचे आहे.
म्हणजेच दाराशी आलेल्या याचकाची सर्व मनोरथे पूर्ण करणे, त्यास हवे असलेले दान त्याच्या पदरी घालणे हे जसे कल्पतरुचे कर्तव्य आहे, त्याप्रमाणेच लोखंडाचे सोन्यात रुपांतर करणे हा परिसाचा धर्म आहे, त्याचे कर्तव्य आहे. आणि तो त्यास अभिमानाने मिरवतो व कटाक्षाने पाळतो.
किंबहुना ही त्यास मिळालेली सर्वात मोठी देणगी असून तुम्हीच ती त्यास देऊ केली आहे. म्हणजेच परीसाला तुमच्याकडून मिळालेले ते एक देणेच आहे. एकार्थी त्याला दिलेली तुम्ही ती सिदधीच आहे आणि तो देखील त्यास अद्याप जागृत आहे.
म्हणजेच आपल्या कर्तव्यास ते दोघेही अद्याप विसरलेले नसून आपापल्य...
Read More
तुकाराम महाराज म्हणतात हे देवा नारायणा, हे पांडुरंगा ज्याप्रमाणे कल्पतरुचे झाड दाराशी आलेल्या याचकाचा कधीही अव्हेर करीत नाही, त्यास केव्हाही विन्मुख होत नाही, त्याकडे केव्हाही पाठ फिरवत नाही आणि वर त्यास कधीही रिकाम्या हाती माघारी धाडत नाही..
त्याप्रमाणेच तुमचे देखील वर्तन असावयास हवे. कारण तुम्ही देखील त्या कल्पतरु वृक्षाप्रमाणेच एक आहात. नव्हे, कल्पतरुच आहात. किंबहुना तुम्ही त्याहूनही श्रेष्ठ आहात, सर्वात सर्वोत्तम आहात. तरीदेखील तुम्ही तुमचा धर्म विसरता आहात.
म्हणजेच ज्याप्रमाणे कल्पतरुचे झाड आपला धर्म, आपले कर्तव्य विसरत नाही आणि परिस देखील आपले कर्तव्य संपूर्णपणे जाणून आहे, त्याप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या कर्तव्याप्रति दक्ष असणे गरजेचे आहे.
म्हणजेच दाराशी आलेल्या याचकाची सर्व मनोरथे पूर्ण करणे, त्यास हवे असलेले दान त्याच्या पदरी घालणे हे जसे कल्पतरुचे कर्तव्य आहे, त्याप्रमाणेच लोखंडाचे सोन्यात रुपांतर करणे हा परिसाचा धर्म आहे, त्याचे कर्तव्य आहे. आणि तो त्यास अभिमानाने मिरवतो व कटाक्षाने पाळतो.
किंबहुना ही त्यास मिळालेली सर्वात मोठी देणगी असून तुम्हीच ती त्यास देऊ केली आहे. म्हणजेच परीसाला तुमच्याकडून मिळालेले ते एक देणेच आहे. एकार्थी त्याला दिलेली तुम्ही ती सिदधीच आहे आणि तो देखील त्यास अद्याप जागृत आहे.
म्हणजेच आपल्या कर्तव्यास ते दोघेही अद्याप विसरलेले नसून आपापल्या स्वधर्माला ते संपूर्णपणे राखून आहेत आणि त्यास अत्यंत चिकाटीने व निष्ठेने पार पाडताहेत. जणूकाही ते त्याच्याशी एकरूपच झाले आहेत.
त्याप्रमाणेच तुम्ही देखील वागावे अशी माझी आशा आहे. तुम्हीदेखील स्वकर्तव्याला सदैव जागरूक राहून आपले कार्य, आपले कर्तव्य नेमाने पार पाडावे. आपला स्वधर्म कटाक्षाने पाळावा व तो आचरणात आणावा असे माझे तुम्हांला सांगणे आहे.
परंतु तसे न करता तुम्ही अगदी त्याविरुद्ध वागत आहात, त्याच्या विरूद्धच तुमचे वर्तन सुरू आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला साधी त्याची जाणीव देखील राहिलेली नाही.
आणि म्हणूनच तुमच्या दाराशी येऊन मी तुम्हाला साद घालत आहे. हाका मारून तुमच्या कर्तव्याची आठवणच करून देत आहे. किंबहुना गर्जना करून तुम्हाला तुमच्या धर्माची जाणीवच करून देत आहे. आणि त्याद्वारे माझे गाऱ्हाणे देखील मांडत आहे.
अभंग २७९
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!