आणि मुख्य म्हणजे भोग भोगणे आले असता मनुष्याने केव्हाही त्याचा शोक करत बसून नये. टिपे गाळत बसू नये. तसे करत बसाल किंवा टिपे गाळत बसाल तर शोकाने केवळ शोक वाढून पदरी अधिकच दुख येईल आणि जीवन अधिकाधिक दुखीकष्टी होईल. कारण शोकाने शोक केवळ वाढतच जातो आणि परिस्थिती अधिकच बिकट होऊन बसते. किंबहुना ती अधिकच अवघडच होऊन बसते आणि सर्वकाही हाताबाहेर जाते.
त्यापेक्षा देवाचे नाम गाऊन आणि त्याची आठवण ठेवून परिस्थिती कशी सुसह्य होत जाईल हे पाहावे.
परंतु तसे न करता कोणी जर येथे प्रत्येक परिस्थितीत दुःख करत बसेल, टिपे गाळत राहील किंवा शोक करत राहील, तर शोकाने शोक अधिकच वाढतच जाऊन परिस्थिती अधिकच हाताबाहेर जात जाईल आणि सर्वकाही अवघडच होऊन बसेल. आणि अशात जर लंडीपणे / खोटेपणाने वागाल तर प्रारब्ध अधिकाधिक गाढ होत जाईल.
आणि म्हणून तसे घडू नये यासाठी मनुष्याने नेहमी सत्याने वागावे, मनाला धैर्याची वाट दाखवावी, दैनंदिन जीवनातच धीर धरण्यास शिकवावा आणि जितक्या शक्य तितक्या लवकर परमार्थाला लागावे, श्री हरिला शरण जावे, जेणेकरून आयुष्य केवळ सुखकरच न होता संपूर्ण चिंताविरहीत देखील होऊन ह्या भवसागरात असूनही भवदुःख मनुष्याच्या जवळ येऊ शकणार नाहीत, त्याला शिवू शकणार नाही आणि त्याची प्रारब्धातून हळूहळू सुटका होत जाईल.
त्यापेक्षा धैर्य दाखवणे केव्हाही चांगले, धीराने घेणे केव्हाही चांगले.
कारण ते म्हणतात ह...
Read More
आणि मुख्य म्हणजे भोग भोगणे आले असता मनुष्याने केव्हाही त्याचा शोक करत बसून नये. टिपे गाळत बसू नये. तसे करत बसाल किंवा टिपे गाळत बसाल तर शोकाने केवळ शोक वाढून पदरी अधिकच दुख येईल आणि जीवन अधिकाधिक दुखीकष्टी होईल. कारण शोकाने शोक केवळ वाढतच जातो आणि परिस्थिती अधिकच बिकट होऊन बसते. किंबहुना ती अधिकच अवघडच होऊन बसते आणि सर्वकाही हाताबाहेर जाते.
त्यापेक्षा देवाचे नाम गाऊन आणि त्याची आठवण ठेवून परिस्थिती कशी सुसह्य होत जाईल हे पाहावे.
परंतु तसे न करता कोणी जर येथे प्रत्येक परिस्थितीत दुःख करत बसेल, टिपे गाळत राहील किंवा शोक करत राहील, तर शोकाने शोक अधिकच वाढतच जाऊन परिस्थिती अधिकच हाताबाहेर जात जाईल आणि सर्वकाही अवघडच होऊन बसेल. आणि अशात जर लंडीपणे / खोटेपणाने वागाल तर प्रारब्ध अधिकाधिक गाढ होत जाईल.
आणि म्हणून तसे घडू नये यासाठी मनुष्याने नेहमी सत्याने वागावे, मनाला धैर्याची वाट दाखवावी, दैनंदिन जीवनातच धीर धरण्यास शिकवावा आणि जितक्या शक्य तितक्या लवकर परमार्थाला लागावे, श्री हरिला शरण जावे, जेणेकरून आयुष्य केवळ सुखकरच न होता संपूर्ण चिंताविरहीत देखील होऊन ह्या भवसागरात असूनही भवदुःख मनुष्याच्या जवळ येऊ शकणार नाहीत, त्याला शिवू शकणार नाही आणि त्याची प्रारब्धातून हळूहळू सुटका होत जाईल.
त्यापेक्षा धैर्य दाखवणे केव्हाही चांगले, धीराने घेणे केव्हाही चांगले.
कारण ते म्हणतात ह्या संसारात अशी कोणती गोष्ट आहे जी केल्याने साध्य होत नाही आणि जो कोणी प्रसंगांना हिमतीने तोंड देतो त्याला मग सगळे शक्य होते.
परंतु त्याउलट जर लंडीपणाने / खोटेपणाने वागाल तर सर्व काम बिघडून परिस्थिती चिघळत जाईल आणि सर्वच बिकट होऊन बसेल.
कारण ते म्हणतात खोटेपणाचे फळ वाईट असून ते भोगण्यास पुन्हा तुमच्या वाट्याला येते आणि अशारितीने प्रारब्धात अधिकच भर पडत जाते.
आणि मुख्य म्हणजे कठीण परिस्थिती आली असता येथे कोणीही मदतीचा हात पुढे करत नाही, आपले सगेसोयरे, मित्रपरिवार, नातलग देखील कोणीही अशावेळी कामाला येत नाहीत.
लोकं केवळ मदतीचा आव आणतात आणि आपल्या हो मध्ये हो मिसळतात, परंतु प्रत्यक्ष मदतीच्या वेळी साह्य करण्यास मात्र कोणीही पुढे येत नाही.
आणि म्हणुनच तुकोबाराय म्हणतात अशावेळी जो कोणी एकमेव साहाय्यकर्ता असतो, जो कोणी येथे खरा रक्षणकर्ता असतो, प्रत्येकाने त्याचीच कास धरावी, त्यालाच मनोभावे शरण जावे.
किंबहुना तशी वेळ येण्याआधीच प्रत्येकाने वेळीच परमार्थाला लागावे आणि जीवनातील एकेक क्षण कामी लावावा, एकेक घडी आधीच साधून घ्यावी.
कारण मनुष्याचे प्रारब्ध बघता किंवा लक्षात घेता जो जितका वेळ परमार्थाला लावेल तितके कमीच आहे, थोडेच आहे आणि प्रारब्ध सुसह्य करण्यासाठी कोणाला किती पुण्याची गरज आहे हे माहित नाही.
आणि म्हणून हळूहळू का होईना येथे प्रत्येकाने तातडीने आपल्या हिताकडे वाटचाल करण्यास सुरुवात करावी, त्याचे नाम गाऊन आणि सदैव त्याची आठवण ठेवून त्याच्याशी नाते घट्ट करत न्यावे.
Show Less
Comments
खूप छान